प्रदर्शनाच्या 22 दिवसांनंतर ‘पुष्पा 2’मधील गाणं करावं लागलं डिलिट; अल्लू अर्जुनचा वाद भोवला

प्रदर्शनाच्या 22 दिवसांनंतर ‘पुष्पा 2’मधील गाणं करावं लागलं डिलिट; अल्लू अर्जुनचा वाद भोवला

एकीकडे अभिनेता अल्लू अर्जुन हा संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणामुळे वादात अडकला असताना दुसरीकडे ‘पुष्पा 2’च्या निर्मात्यांनी चित्रपटातील एक वादग्रस्त गाणं युट्यूबवर प्रदर्शित करण्यासाठी चुकीची वेळ निवडली. 24 डिसेंबर रोजी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘दम्मुंट्टे पट्टुकोरा’ हे गाणं युट्यूबवर रिलीज केलं. मात्र अवघ्या काही तासांतच त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे अखेर निर्मात्यांना ते गाणं युट्यूबवरून काढून टाकावं लागलं. इतकंच नव्हे तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरूनही हे गाणं हटवण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये पुष्पा (अल्लू अर्जुन) आणि इन्स्पेक्टर भंवर सिंह शेखावत (फहाद फासिल) यांच्यातील वाद चित्रित करण्यात आला आहे.

गाण्यात नेमकं काय?

‘पुष्पा 2’मधील एका दृश्यात भंवर सिंह शेखावत (फहाद फासिल) हा लाल चंदनाचा तस्कर पुष्पाराजचं (अल्लू अर्जुन) रेकॉर्डिंग करताना दिसून येतो. ज्यामध्ये पुष्पा त्याला चॅलेंज करतो की, “दम्मुंट्टे पट्टुकोरा शेखावतू, पट्टूकुंटे वदिलेस्ता सिंडिकेटू” (हिंमत असेल तर मला पकडून दाखव शेखावत, जर तू यशस्वी झालास तर मी सिंडिकेट सोडेन.) यानंतर जेव्हा भंवरला वाटू लागतं की त्याने पुष्पाला हरवलंय, तेव्हा त्याच्या त्याच डायलॉगचा रिमिक्स व्हर्जन एखाद्या गाण्याप्रमाणे वाजवतो आणि त्यावर नाचू लागतो.

चुकीचा टायमिंग

या गाण्याचे बोल आणि त्याच्या प्रदर्शनाच्या चुकीच्या वेळेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनवर खटला सुरू आहे. या घटनेवरून खऱ्या आयुष्यात पोलीस आणि अल्लू अर्जुन यांच्यात बऱ्याच घडामोडी दिसत असताना चित्रपटात पोलिसाला धमकावण्याच्या डायलॉगवरून थेट गाणं प्रदर्शित केल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. देवी श्रीप्रसाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं टी-सीरिजने 24 डिसेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित केलं. मात्र पोलिसांना आव्हान देणारे डायलॉग्स या गाण्यात असल्याने त्याची वेळ चुकली असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. या गाण्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया पाहून अखेर निर्मात्यांनी हे सगळीकडून हटवण्याचा निर्णय घेतला.

संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 14 डिसेंबरला त्याला जामीन मिळाला. या घटनेनंतर पोलीस विभाग आणि तेलंगणा सरकार यांनी अल्लू अर्जुनवर विविध आरोप केले आहेत. अल्लू अर्जुन बेजबाबदारपणे वागला, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून त्याने हे आरोप फेटाळले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;