नवरदेवाशिवाय लागली लग्नं! 20 हून अधिक नवरींना मिळालं मॅरेज सर्टिफिकेट, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत घोळ

नवरदेवाशिवाय लागली लग्नं! 20 हून अधिक नवरींना मिळालं मॅरेज सर्टिफिकेट, मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेत घोळ

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेमध्ये फसवणुकीचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील कौशांबीमध्ये आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात तब्बल 20 हून अधिक मुलींचा विवाह नवरदेवाशिवायच लावून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयजीआरएसच्या माध्यमातून एका तक्रारदाराने समाज कल्याण मंत्र्यांकडे याची तक्रार केली आहे. त्याने दावा केला आहे की, 10-10 हजारांची लाच घेऊन नवरदेवाशिवायच मुलींचे लग्न लावून दिले आणि त्यांना प्रमाणपत्रही दिले.

कौशांबीच्या डीएम मधुसूदन हुलगी यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत तपासाचे आदेश दिले आहेत. याशिवाय आरोप सिद्ध झाल्यास फसवणुकीत सहभागी असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आले आहे. सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेतंगर्गत 23 नोव्हेंबर रोजी सिरथू तहसीलमधील मिठेपूर सायरा येथील बाबू सिंह पदवी महाविद्यालयात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये दोनशेहून अधिक मुलींचे लग्न लावण्यात आले होते. कडा ब्लॉकमधील सायरा मिठेपूर, अंडावा, शहजादपूर आणि सिरथू ब्लॉकमधील कोखराज, बिदानपूर, भदवा आदी गावांतील वधू-वरांनी सामूहिक विवाह कार्यक्रमात सहभाग घेतला.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह कार्यक्रमामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष धर्मराज मौर्य, राज्य महिला आयोगाच्या सदस्य प्रतिभा कुशवाहा, सिरथू ब्लॉकचे प्रमुख प्रतिनिधी लवकुश मौर्य यांच्यासह जिल्ह्यातील उच्च पदाधिकारी सहभागी झाले होते. तक्रारकर्ते डीएस मौर्य यांनी IGRS पोर्टलद्वारे समाज कल्याण राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. 20 पेक्षा अधिक मुलींचे नवरदेव हे सामूहिक विवाह कार्यक्रमात आले नव्हते. मात्र, सिरथू आणि कडा ब्लॉकचे सहाय्यक विकास अधिकारी यांनी प्रत्येकी 10 हजार रुपये घेऊन लग्न लावून दिले. गरीब मुलींच्या लग्नाच्या फायली सहायक विकास अधिकारी दलालांच्या माध्यमातून तयार करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रत्येक जोडप्याकडून 3 ते 5 हजार रुपयांचा निधी जमा केला जातो. ज्या मुलींचे नवरदेव परदेशात पैसे कमवायला जातात आणि लग्न समारंभाला उपस्थित राहू शकत नाहीत अशा मुलींकडून प्रत्येकी 10 हजार रुपये इतकी मोठी रक्कम आकारली जाते. या संपूर्ण प्रकरणी डीएम मधुसूदन हुलगी यांनी सांगितले की,जर असे प्रकरण समोर आले असेल तर आम्ही ते पुन्हा तपासू. जितक्या लोकांचे लग्न झाले आहे त्याच क्रमाने विभागाकडून पैसे दिले जातील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;