कुलाबा, माझगाव, वरळी, मालाडमध्ये हवा बिघडली, एक्यूआय गेला 200 ते 265 वर

कुलाबा, माझगाव, वरळी, मालाडमध्ये हवा बिघडली, एक्यूआय गेला 200 ते 265 वर

मुंबईत थंडी वाढत असतानाच हवेचे प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली आहे. नेव्हीनगर कुलाब्यात आज हवेच्या गुणवत्तेचा एक्यूआय तब्बल 317 वर म्हणजे ‘अतिशय खराब‘ नोंदवला गेला. शिवाय माझगाव, गोवंडी शिवाजीनगर, वरळी, मालाडच्या हवेतही प्रदूषण वाढली असून ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ 200 ते 265 पर्यंत म्हणजे ‘खराब’ नोंदवला गेला. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातच धुरक्यामुळे कमी होणारी दृश्यमानता आणि प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’-‘अतिशय शुद्ध हवा’ तर 51 ते 100 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एक्यआयू’ – ‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एक्यूआय’ – ‘खराब’ हवा समजली जाते. तर 301 ते 400 ‘एक्यूआय’ – ‘अतिशय खराब’ तर 401 ते 500 ‘एक्यूआय’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते.

प्रदूषणकारी बांधकामांना नोटिसा

गेल्या वर्षी प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठल्याने सरासरी ‘एक्यूआय’ अडीचशेच्या पार गेला होता. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली. यामध्ये या वर्षी दोन नियम वाढवण्यात आले आहेत.

यामध्ये शेकोटी पेटवण्यास बंदी आणि बांधकामाच्या ठिकाणी जेवळ बनवण्यासाठी चूल तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही नियमावली मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर बांधकामांना पाळणे बंधनकारक करण्यात आले असून नोटीसही बजावण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;