डॉक्टरी सोडून मॉडेल झाली, लग्नासाठी धर्म बदलला अन् नंतर घटस्फोट; मराठी अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य फारच चर्चेत

डॉक्टरी सोडून मॉडेल झाली, लग्नासाठी धर्म बदलला अन् नंतर घटस्फोट; मराठी अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य फारच चर्चेत

अभिनेत्री म्हटलं की तिच्या कामासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यातही असे बरेच प्रसंग घडत असतात. ज्यामुळे वैयक्तिक आयुष्य उद्धवस्त होतं. असचं काहीसं घडलं एका मराठी अभिनेत्रीसोबत जिचं बॉलिवूडमध्येही नाव आहे. शिवाय ती एक सुपर मॉडेल आहे.

डॉक्टरी सोडून मॉडेल झाली

पहिली भारतीय जिने मिसेस वर्ल्ड हा किताब जिंकला अशी अभिनेत्री अदिती गोवित्रीकर. ती एक सुपरमॉडेल आहे. पण आदितीने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे तसेच ती मानसशास्त्रज्ञसुद्धा आहे.

अदितीचा जन्म महाराष्ट्रातील पनवेल येथे झाला. एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर तिने मॉडेलिंग सुरू केले आणि 1996 मध्ये ग्लॅडरॅग्स मेगामॉडेल स्पर्धा जिंकली. तिला मोठं नाव आणि यशही मिळत होतं पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नंतर सगळच संपलं.

मिसेस वर्ल्ड हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. आदितीने एकेकाळी आपल्या सौंदर्याने लोकांना वेड लावले होते. एका रिपोर्टनुसार, अदिती तिच्या वैद्यकीय प्रॅक्टिस दरम्यान तिचा सिनिअर मुफजल लकडावालाच्या प्रेमात पडली होती. हे दोघे जवळपास सहा वर्षे डेट करत होते. 1997 मध्ये जेव्हा अदिती मेडिकल कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाली तेव्हा तिने आणि मुफजलने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नासाठी धर्म बदलला

मुफजल वेगळ्या धर्माचा असल्याने तिने लग्न करू नये असे तिच्या पालकांना होते. पण तिने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन आणि धर्म बदलून अखेर लग्न केलं. त्यांनी 1998 मध्ये लग्न केलं. त्यांनी नागरी आणि मुस्लिम कायद्यानुसार विवाह केला. मुफजलसोबत लग्न केल्यानंतर आदितीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नावही बदलून सारा लकडावाला ठेवले. नंतर ते एक मुलगी आणि एका मुलाचे पालक झाले.

घटस्फोटाच्या 15 वर्षांनंतरही पश्चाताप 

मुलाच्या जन्मानंतर आदितीचे वैवाहिक जीवन विस्कळीत होऊ लागले. मुफजलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि अदितीच्या कामाच्या कमिटमेंट्समुळे अडचणी निर्माण होऊ लागल्या. दोघांमधील भांडणाच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यादरम्यान मुफजल ऑस्ट्रेलियाला गेला आणि आदिती तिच्या मुलांसह तिच्या माहेरच्या घरी गेली.

अदिती आणि मुफजल 2008 मध्ये वेगळे झाले आणि अदितीने मुलांचा ताबा स्वतःकडे ठेवला. एका मुलाखतीत आदितीने सांगितले होते की, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण तो होता जेव्हा मी माझे लग्न वाचवू शकले नाही. मला जिंकायला आवडते. मला लहानपणापासून जिंकायचे होते, वर्गात पहिली यायचे. अशा स्थितीत नात्याचे नुकसान सहन करणे माझ्यासाठी कठीण होते. मी विचार करत होते हे माझ्या बाबतीत कसे घडले?’ घटस्फोटाच्या 15 वर्षांनंतरही आदितीला अजूनही या गोष्टीचा पश्चाताप आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;