अधिवेशन कुचकामी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाईल, संजय राऊत यांची टीका

अधिवेशन कुचकामी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाईल, संजय राऊत यांची टीका

महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला. आमदारांनी मंत्रीपदाची शपथ जरी घेतली असली तरी अद्याप कोणते खाते कोणाकडे याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाला आणखी दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे सांगितले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”खातेवाटप झालेले नसल्यामुळे अधिवेशन कुचकामी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जाईल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

”हे बिन खात्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री आहेत पण त्यांच्याकडे कोणती खाती ते कुणी सांगू शकत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांच्याकडे कोणतं खातं आहे ते सांगता येत नाहीए. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत तर सगळी बोंब आहे. जवळपास निकालानंतर एक महिन्याने मंत्रीमंडळाने शपथ घेतल्या. शपथ घेतल्यानंतर तासा दीड तासात खातेवाटपाची यादी जाहीर होते. आज अधिवेशन आहे. अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास असतो. कोणी कोणत्या खात्याची उत्तरं द्यायची. की सगळ्याचा खात्याची उत्तरं फडणवीस देणार आहेत. सरकारमध्ये मंत्रीमंडळात राज्य चालवण्याच्या बाबतीत गोंधळ दिसतोय. या सरकारकडून अधिवेशन कुचकामी करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण विरोधक तसं होऊ देणार नाही. राज्यात असंख्य प्रश्न आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. विरोधक प्रश्न विचारतील. ईव्हीएमच्या कृपेने विरोधकांची संख्या कमी असली तरी ते ताकदीचे आहेत. आदित्य ठाकरे, भास्कर जाधव , नाना पटोले, जयंत पाटील, रोहीत पवार ही ताकदीची माणसं विधानसभेत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;