‘EVM – निवडणूक आयोगाने बहुमत दिल्यानंतर लगेच कामाला लागायला हवं होतं’, आदित्य ठाकरे यांचा टोला

‘EVM – निवडणूक आयोगाने बहुमत दिल्यानंतर लगेच कामाला लागायला हवं होतं’, आदित्य ठाकरे यांचा टोला

ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाने इतकं बहुमत दिल्यानंतर महायुतीने लगेच कामाला लागायला हवं होतं, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर लगावला आहे. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ”काही लोक जॅकेट शिवून असतात, मंत्रिपद मिळावं म्हणून प्रार्थना करत असतात. ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा असू शकते. सरकार ईव्हीएमने निवडल्यानंतर, सरकार स्थापनेला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यानंतरही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या पहिल्या शपथविधीला खूप वेळ लागला. यानंतर यांच्यात जी भांडणं आणि जो स्वार्थीपणा सुरू आहे, हे बाजूला ठेवून लोकांची सेवा करायला हवी होती.”

फडणवीस सरकारवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, ”ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाने इतकं बहुमत दिल्यानंतर महायुतीने लगेच कामाला लागायला हवं होतं. मात्र मला काय मिळणार, तुला काय मिळणार, यांचा हा स्वार्थी आणि हावरटपणा लोकांसमोर आला आहे. बहुमत मिळूनही हे खुश नाही आहे. कुठेही आनंद साजरा केला नाही, व्यक्त केला नाही. यांचा पुढचा विचार काय तर मंत्रिपद कोणतं मिळणार, कुठलं खातं मिळणार, त्यातून खायला काय मिळणार? गद्दार गॅंगमधून हे जे विचार आले आहेत, ते भयानक आहे. महाराष्ट्राचे चित्र कधीही असं नव्हतं आणि नसावं, ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना असेल.”

यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ”जर भाजप सरकारची रस्ते घोटाळ्यावर खरोखरच कारवाई करण्याची इच्छा असेल, तर त्यांना त्या वेळचे घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या कार्यकाळातील दोन पालकमंत्री – लोढा आणि केसरकर यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवावे लागेल, यानंतरच निष्पक्षपाती चौकशी होऊ शकते.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;