मोदींची टीका…टीका… आणि टीका पंडित नेहरू ते राहुल गांधी

मोदींची टीका…टीका… आणि टीका पंडित नेहरू ते राहुल गांधी

देशाच्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे पंडित नेहरू, इंदिरा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. मोदींच्या भाषणातील बहुतांशी भाग केवळ गांधी-नेहरू कुटुंब आणि काँग्रेसवर टीका करणारा होता.

मोदी म्हणाले, संविधानाचा 75 वर्षांचा प्रवास हा एक संस्मरणीय प्रवास आहे. आपल्या संविधान निर्मात्याची दैवी दृष्टी आणि योगदान आहे. हिंदुस्थान केवळ प्रचंड लोकशाही राष्ट्र नाही तर लोकशाहीची जननी आहे. संविधानाचे महत्व सांगण्यासाठी मोदी यांनी यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुरुषोत्तमदास टंडन आणि डॉ. राधाकृष्णन या तीन दिग्गज नेत्यांचे विधान वाचून दाखविले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस, नेहरू-गांधी कुटुंबाला लक्ष्य केले. 1947 ते 1952 या काळात देशात इलेक्टेड नाही तर सिलेक्टेड सरकार होते. 1952 मध्ये ऑर्डियन्स करून संविधानात दुरुस्ती केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला. पंडित नेहरूंची परंपरा इंदिरा गांधींनी सुरू ठेवली. त्यांनी आणिबाणी लावली. राजीव गांधींनी घटना दुरुस्ती केली, असे मोदी म्हणाले. काँग्रेसच्या एका नेत्याने युपीए सरकारच्या काळात कॅबिनेटचा निर्णय फाडला होता, अशी टीका त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता केली. काँग्रेसने 60 वर्षांत 75 वेळा घटनादुरुस्ती केली, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींना चक्क ‘विविधतेत एकता’ची आठवण झाली. आपले संविधान हे देशाच्या एकात्मतेचा आधार आहे. विविधतेत एकता हे देशाचे वैशिष्ट्ये आहे. आपले सरकार त्याच दृष्टीने काम करत असून, ‘सबका साथ सबका विकास’ हे आपले धोरण असल्याचे मोदी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;