राहुल गांधी यांनी परमार यांच्या मुलांशी फोनवरून साधला संवाद, न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

राहुल गांधी यांनी परमार यांच्या मुलांशी फोनवरून साधला संवाद, न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

ईडीच्या छापेमारीनंतर मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील परमार दाम्पत्याने आत्महत्या करत जीवन संपवले. परमार दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परमार यांच्या मुलांशी फोनवरून संवाद साधत त्यांचे सांत्वन केले आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांच्या फोनवरून राहुल गांधींनी परमार यांच्या मुलांशी संवाद साधला. यावेळी मुलांचे सांत्वन करत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आणि त्यांना भेटायला येण्याचे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.

परमार दाम्पत्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी ईडी आणि भाजप नेत्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच राहुल गांधी यांना मुलांना एकटे सोडू नका असे आवाहन केले आहे.

परमार दाम्पत्य काँग्रेस पक्षाचे समर्थक होते. ईडीने त्यांच्या राजकीय सहभागामुळेच त्यांना त्रास दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. गांधींच्या ‘भारत जोडो (न्याय) यात्रेत’ परमार जोडप्याच्या मुलांनी राहुल गांधी यांना त्यांच्या पिग्गी बँक्स दिल्या होत्या.

सुसाईड नोटमध्ये राहुल गांधींच्या उल्लेखाबाबत विचारले असता, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी ‘काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे. आम्ही त्यांची काळजी घेऊ. म्हणूनच मी काल तिथे गेलो होतो’, असे सांगतिले.

परमार दाम्पत्याचा मृत्यू हा आत्महत्या नसून राज्य पुरस्कृत हत्या असल्याचा आरोप जितू पटवारी यांनी केला आहे. ईडीचा वापर नेत्यांना त्रास देण्यासाठी केला जात आहे, जेणेकरून ते भाजपमध्ये सहभागी होतील. ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून छळ झाल्याने अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;