मिंधेंना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा, तरच हे वॉशिंग मशीन सरकार नसल्याचे मानू; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

मिंधेंना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा, तरच हे वॉशिंग मशीन सरकार नसल्याचे मानू; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

”देवेंद्र फडणवीस यांना खरोखर संधी आहे. जर त्यांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल, तर चौकशी (रस्ते घोटाळ्याची) पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा. जोपर्यंत सिद्ध होत नाही की, त्यांचे यात हात नाही, कंत्राटदारांचा फायदा झाला नाही, तोपर्यंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा. तर आणि तरच आम्ही मानू की, हे वॉशिंग मशीनचे सरकार नाही”, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले की, ”गेल्या दोन वर्षात आम्ही जो रस्ते घोटाळा उघड करत आलो आहोत, 2022 आणि 2023 मध्ये आधी सहा हजार कोटींचा आणि नंतरही सहा हजार कोटींचा घोटाळा आम्ही पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर आणला होता. यानंतर मुंबई महानगरपालिकेला मान्य करावं लागलं, अॅडव्हान्स मोबेलिटी देण्याची आणि तो खर्च सहा हजार कोटीनंतर पाच हजार कोटींवर आला. त्यावेळीही मी सांगत होतो, घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यात हात आहे का?”

दीपक केसरकर यांच्या कामकाजावर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले की, ”अजूनही विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश देण्यात आलेले नाही. यातून ते किती कार्यक्षम आहे, मंत्री म्हणून त्यांनी कसं काम केलं, हे सगळ्यांना माहित आहे. ते आणि मंगलप्रभात लोढा यांचा या घोटाळ्यात काही हात आहे का? हे अजूनही कुठे स्पष्ट झालं नसून याचं सरकारकडून उत्तरही आलं नाही.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ”मागच्या आणि या वर्षी मी हे घोटाळे लोकांसमोर आणले, यानंतर आता रस्त्यांची कामे घाणेरड्याप्रकारे झाल्यानंतर मुंबई भाजप या रस्त्यांच्या कामावर एसआयटी लावा, असं म्हणत आहे. हेच मी गेले दोन वर्ष सांगत होतो की, मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या देखरेखीत रस्त्यांचा घोळ सुरू आहे, त्याची चौकशी करा. आता भाजपला जाग आली आहे. दोन वर्ष झाले मी सांगत आहे की, हिम्मत असेल तर या सरकारमधून बाहेर पडा, निवडणूक होऊन गेल्या आहेत. कंत्रादारांना त्यांचे पैसे मिळाले, घोटाळा झाला. मात्र आज भाजप नुसतं काहीतरी दाखवायचं म्हणून बोलत आहे की, एसआयटी चौकशी लावा. मात्र माझी मागणी ही आहे की, एसआयटीपेक्षा ईब्ल्युओची चौकशी लावा, हवं तर आमच्या आमदारांचे एक पथक बनवा. यात पत्रकार आणि तज्ज्ञांनाही असुद्या. याच रस्ते घोळ्यादरम्यान मी त्यावेळीही सांगत होतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमिपूजनाला आणू नका. पंतप्रधानांचा हा अपमान आहे की, तुम्ही त्यांच्या हाती एका भ्रष्ट कामाचे भूमिपूजन करून घेत आहात. दुर्दैवाने एकनाथ शिंदे यांच्या नादात ते भूमिपूजन घाईघाईत करून घेतलं. मात्र हे भूमिपूजन करून घेतल्यानंतर आपण पाहत आहोत की, मुंबईत 2022 – 23 चे रस्ते झाले नाही आणि 2023 – 24 चे रस्तेही झाले नाही. हा घोटाळा तेव्हाही होता, आजही आहे. आज मुंबई भाजप नाटक करत आहे, मग जेव्हा मी बोलत होतो, पुरावेही मी समोर आणले, तेव्हा तुम्ही का, काही बोलला नाही. याचे उत्तर देखील मुंबई भाजपने देणे गरजेचे आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;