दिल्लीत भाजपकडून हजारो मतदारांची नावं वगळण्याचा कट, ‘आप’कडून तीन हजार पानांचे पुरावे सादर

दिल्लीत भाजपकडून हजारो मतदारांची नावं वगळण्याचा कट, ‘आप’कडून तीन हजार पानांचे पुरावे सादर

दिल्लीत भाजपकडून हजारो मतदारांची नावं वगळण्याचा भाजपचा कट आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी आपने निवडणूक आयोगाकडे तीन हजार पानांचे पुरावे सादर केले आहेत.

आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज आम्ही निवडणूक आयोगाला भेट दिली आणि भाजप कसे दिल्लीत कसे लोकांची मतं कापत आहेत त्याचा 3 हजार पानांचा पुरावा सादर केला आहे. गरीब आणि दलित मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली जात आहेत. सगळ्यांनाच या मतांची किंमत माहित आहे. शहादरा विधानसभा मतदारसंघातून 11 हजार मतदारांची नावं काढून टाकण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करत आहे हे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले.

निवडणुकीपूर्वी ही नावं काढू नका अशी आम्ही विनंती केली आहे. तसेच भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी ही नावं हटवण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. निवडणुकीपूर्वी ही नावं काढली जाणार नाही असे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे असे केजरीवाल यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;