धनखड यांना हटवण्यासाठी इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव का आणला? जयराम रमेश यांनी सांगितलं कारण

धनखड यांना हटवण्यासाठी इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव का आणला? जयराम रमेश यांनी सांगितलं कारण

जगदीप धनखड यांना राज्यसभेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करत इंडिया आघाडीने राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी राज्यसभेच्या महासचिवांना घटनेच्या कलम 67 ब अंतर्गत यासंबंधीचा प्रस्ताव सादर केला. आता याबाबतच काँग्रेस खासदार जयराम रमेश यांचे वक्तव्य आलं आहे. ते म्हणजे आहेत की, ही वैयक्तिक बाब नाही. विरोधी पक्षनेत्यांच्या अपमानाच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आहे.

जयराम रमेश म्हणाले की, ”शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , झारखंड मुक्ती मोर्चा, द्रमुक या विरोधी पक्षांच्या खासदारांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.”

सरकारला सभागृहाचे कामकाज चालवायचे नाही, असंही जयराम रमेश म्हणाले आहेत. जयराम रमेश यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांचं नाव घेत आरोप केले आहेत की, राज्यसभेचे कामकाज चालू न देण्याबाबत रिजिजू यांनी राज्यसभेचे अध्यक्ष आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी दावा केला की, ”फ्लोअर लीडर्सच्या बैठकीत रिजिजू म्हणाले होते की, तुम्ही (विरोधी पक्ष) लोकसभेत जोपर्यंत अदानीचा मुद्दा मांडत राहाल, तोपर्यंत आम्ही (सत्ताधारी पक्ष) राज्यसभेचे कामकाज चालू देणार नाही.”

यामुळे आणण्यात आला अविश्वास प्रस्ताव

जयराम रमेश यांनी जगदीप धनखड यांना राज्यसभेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणणे हा एक वेदनादायक निर्णय असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले की, ”अध्यक्ष राज्यसभेचे कामकाज अत्यंत पक्षपाती पद्धतीने चालवत आहेत. त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय इंडिया आघाडीकडे पक्षांकडे पर्याय नव्हता. संसदीय लोकशाहीच्या हितासाठी हे पाऊल उचलावे लागले.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;