ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व सोपवले पाहिजे – लालू प्रसाद यादव

ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व सोपवले पाहिजे – लालू प्रसाद यादव

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची मनीषा बोलून दाखवली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ममता बॅनर्जींमध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी देखील ममता बॅनर्जींना पाठिंबा दर्शवला आहे. ”ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करायला हवे”, अशी प्रतिक्रीया लालू प्रसाद यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

”काँग्रेसने ममता बॅनर्जींचा विरोध करण्याचा काही अर्थ नाही. त्यांच्या विरोधाने काही होणार नाही. ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचे प्रमुख बनवायला हवे”, असे लालू प्रसाद यादव म्हणाले.

मला संधी मिळाल्यास मी ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे. मी सक्षमपणे आघाडीचं नेतृत्व करेन. बंगालच्या बाहेर जाण्याची आपली इच्छा नाही, पण मी इथून ‘इंडिया’ आघाडी चालवू शकते, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपली इच्छा व्यक्त केली.

मी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱयांवर ती चालवण्याची जबाबदारी आहे. ते जर हे व्यवस्थित करत नसतील तर त्याला मी काय करू शकते? मी फक्त इतकेच म्हणेन की, सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आनंदच होईल – सुप्रिया सुळे

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचा अविभाज्य भाग आहेत. लोकशाहीत विरोधी पक्षाची मोठी भूमिका आणि जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना आणखी काही जबाबदारी घ्यायची असेल तर आम्हाला खूप आनंद होईल, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;