मराठी माणसावर अन्याय होत असेल तर राज्य आणि केंद्र सरकारने त्यावर पाऊल उचलावं, अंबादास दानवे यांची मागणी

मराठी माणसावर अन्याय होत असेल तर राज्य आणि केंद्र सरकारने त्यावर पाऊल उचलावं, अंबादास दानवे यांची मागणी

बेळगावचा मुद्दा हा मराठी माणसाचा आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे. तसेच मराठी माणसावर अन्याय होत असेल तर राज्य आणि केंद्र सरकारने त्यावर पाऊल उचलावं अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.

विधीमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, बेळगावचा मुद्दा हा कुठल्याही पक्षाचा नाही. हा मुद्दा ना भाजपचा आहे ना, काँग्रेसचा ना शिवसेनेचा. हा मराठी माणसाचा मुद्दा आहे. शिवसेनेने आणि आदित्य ठाकरे यांनी नेहमीच मराठी माणसासाठी भुमिका घेतलेली आहे. कर्नाटकातल्या बेळगाव आणि निपाणीतल्या मराठी माणसांना सुरक्षा द्यावी, लोकशाहीत जे अधिकार असतात ते त्यांना मिळावे अशी आमची मागणी आहे.

तसेच महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचंच सरकार आहे. जर मराठी माणसांवर अन्याय होत असेल तर राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारने त्यावर पाऊल उचलंल पाहिजे. वीर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे स्वातंत्र्यवीर होते. त्यांचे योगदान मोठे होते. कर्नाटक सरकारने विधीमंडळातला त्यांचा फोटो हटवणे चुकीचे आहे. कर्नाटक सरकारने त्यांचा फोटो अजून हटवलेला नाही पण तसे न करण्याबद्दल महाराष्ट्र सरकारने आपली भुमिक स्पष्ट करावी अशी आमची मागणी आहे असेही दानवे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;