Bollywood Celebs : हाय काय अन् नाय काय… पहिलं लग्न मोडताच, दुसरा संसार सुखाने; कोण आहेत हे बॉलिवूड सेलिब्रिटी?

Bollywood Celebs : हाय काय अन् नाय काय… पहिलं लग्न मोडताच, दुसरा संसार सुखाने; कोण आहेत हे बॉलिवूड सेलिब्रिटी?

लग्न ही गोष्ट प्रत्येकाच्या जीवनातील आनंददायी घटना असते. लग्नानंतर आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू होतो. आपला संसार कसा आनंदात चालेल याची सर्वजण खबरदारी घेतात. पण संसार करताना काही अडचणीही येत असतात. त्यामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं. बॉलिवूड कलाकारांच्या बाबतीत या गोष्टी अधिक घडतात. बऱ्याचदा बॉलिवूड कलाकारांचा घटस्फोट झाल्याच्या किंवा त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. पण पहिलं लग्न करून दुसऱ्या विवाहानंतर सुखी जीवन जणारे असंख्य कलाकार आहेत. असे कलाकार कोण आहेत? याची चर्चा आपण करणार आहोत.

अनेक कलाकरांनी पहिलं लग्न अयशस्वी झाल्यानंतर थोडा वेळ घेतला. पुन्हा दुसरा विवाह केला आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांचा हा नवा घरोबा यशस्वीही ठरला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने लग्नाच्या तीन वर्षानंतर 4 डिसेंबर 2024 रोजी अभिनेता नागाकडून तलाक घेतला. नागाने शोभिताशी विवाह करून आयुष्याचा नवा पट मांडला आहे. दुसरं लग्न करून सुखी संसार करणाऱ्या कलाकारांचीच माहिती आपण घेणार आहोत.

अरबाज खान

अरबाज खानने मलायका अरोडासोबत 1998मध्ये लग्न केलं होतं. दोघेही सुखात राहत होते. पण 19 वर्षानंतर अचानक दोगांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला आणि 2017मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर गेल्यावर्षी 2023मध्ये अरबाज खानने दुसरं लग्न केलं. शूरा खानसोबत त्याचा निकाह झाला. दोघांचाही संसार सुखाने सुरू आहे.

नीलम कोठारी

अभिनेत्री नीलम कोठारीच्या आयुष्यातही असं वादळ येऊन गेलं. 2000मध्ये यूकेत राहणारा उद्योगपती ऋषि सेठिया यांच्याशी नीलमने लग्न केलं. पण काही काळानंतर त्यांचा तलाक झाला. त्यानंतर 2011मध्ये नीलमने अभिनेता समीर सोनीशी विवाह केला. सध्या दोघेही आनंदात राहत आहेत.

रेणुका शहाणे

प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्यातील बॉन्डिंग अत्यंत चांगली आहे. दोघेही एकमेकांचा रिस्पेक्ट करतात. एक आदर्श कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. रेणुका यांचं हे दुसरं लग्न आहे. मराठी रंगभूमीचे लेखक आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी रेणुका शहाणे यांचं लग्न झालं होतं. पण नंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर रेणुका यांच्या आयुष्यात आशुतोष राणा आले. 2001 मध्ये दोघांनी विवाह केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;