भरधाव कार थेट तलावात कोसळली, पाच मित्रांचा करुण अंत

भरधाव कार थेट तलावात कोसळली, पाच मित्रांचा करुण अंत

भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट तलावात कोसळल्याने पाच मित्रांचा करुण अंत झाला आहे. तेलंगणातील यदाद्री-भुवनागिरी जिल्ह्यात शनिवारी हा अपघात घडला. एक जण कारच्या काचा तोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने पाचही मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

कारमध्ये एकूण सहा तरुण प्रवास करत होते. सर्व तरुण हैदराबाद येथील रहिवासी असून कारने तेलंगणातील यदाद्री-भुवनागिरी जिल्ह्याकडे चालले होते. यावेळी एका वळणावर चालकाचे अतिवेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट तलावात कोसळली.

कार तलावात कोसळल्याने पाच जणांचा बुडून मृत्यू झाला तर एक जण कारमधून बाहेर पडण्यास यशस्वी झाला. पोलीस अपघात प्रकरणी तपास करत आहेत. तसेच अपघातात बचावलेल्या तरुणाचीही पोलीस चौकशी करणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;