लोकशाही जिंदाबाद! मारकडवाडीत दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सरकारचा निषेध; आम्ही आज शपथ घेणार नाही – आदित्य ठाकरे

लोकशाही जिंदाबाद! मारकडवाडीत दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सरकारचा निषेध; आम्ही आज शपथ घेणार नाही – आदित्य ठाकरे

विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज विधीमंडळात पार पडला. मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग करत शपथविधीवर बहिष्कार घातला. ‘मॉक पोल’ची घोषणा करणाऱ्या मारकडवाडीत ग्रामस्थांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज शपथ घेणार नाही, असे शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजच्या दिवसासाठी निषेध म्हणून शपथ घेतली नाही. बहुमताचे सरकार आल्यानंतर राज्यात जे वातावरण हवे, उत्साह हवा, जल्लोष हवा तसे कुठेही दिसत नाही. कुणीही हा विजय साजरा करत नाहीय. हे बहुमत जनतेने दिलेले आहे की निवडणूक आयोग, ईव्हीएमने दिलेले आहे? हा प्रश्न असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वांनीच मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या माध्यमाने निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले. हे जनतेच्या मनातील प्रश्न आहे. मारकडवाडीतील ग्रामस्थांनी ‘मॉक पोल’ची तयारी केली होती. हे सर्व निवडणूकनंतर होत होते. तिथून जिंकलेल्या उमेदवारानेही ‘मॉक पोल’ला पाठिंबा दिला होता. ‘मॉक पोल’ जनतेच्या मनातील शंकांना उत्तर देणारा होता, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

बॅलेट पेपरवर कोण जिंकू शकते, ईव्हीएमवर कोण, कसे जिंकू शकते हे आम्ही अनेकदा दाखवले आहे. आम्ही पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएमच्या मतांमधील तफावतही दाखवली. पण मारकडवाडीमध्ये फक्त कर्फ्युच नाही तर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करून काही जणांना अटकही करण्यात आली. याचा निषेध म्हणून आम्ही शपथ घेतली नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पाशवी बहुमत हा जनाधार नाही! महाविकास आघाडीचा सभात्याग, शपथविधीवर बहिष्कार

ते पुढे म्हणाले की, आम्ही हरलेलो उमेदवार नाहीत. आम्ही जिंकून आलेलो आहोत. तरी देखील आमच्या मनात ईव्हीएमबद्दल, निवडणूक आयोगाबद्दल शंका आहे. जनतेचा मान राखून त्यांच्या मनात ज्या शंका आहेत त्याचा मान राखून शपथ घेत नाही आहोत.

लोकशाहीचा लॉन्ग मार्च’ आम्ही हाती घेत आहोत. 2014 पासून लोकशाही चिरडण्याचे काम सुरू आहे. लोकसभेत जनतेने निकाल दिला, पण तोच निकाल चिरडण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्याविरोधात आम्ही हे पाऊल उचलले आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

EVM विरोधात वणवा पेटला! शरद पवार, राहुल गांधी मारकडवाडीला जाणार; आव्हाड म्हणाले, ‘ही ठिणगी…’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;