ताजमध्ये चहा प्यायचा असेल तर किती पैसे मोजावे लागतात?; तेवढ्या पैशात तुम्ही…

ताजमध्ये चहा प्यायचा असेल तर किती पैसे मोजावे लागतात?; तेवढ्या पैशात तुम्ही…

प्रत्येकाला मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन राहण्याची इच्छा असते. निदान काही तरी खाता आलं पाहिजे किंवा काही तरी पिता आलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण खिशात तेवढा पैसा नसल्याने काही करता येत नाही. कारण लक्झरी हॉटेल्समध्ये जेवणासोबत डाइनिंग अनुभवासाठीही पैसे घेतले जातात. अनेक बड्या हॉटेलात बाहेर साधारणतः 10 रुपयाला मिळणारी चहा 100 रुपयांना मिळते. भारतातील सर्वात मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सपैकी एक म्हणजे मुंबईतील ताज हॉटेल. तुम्हाला ताज हॉटेलमध्ये चहा कितीला मिळतो हे माहीत आहे का?

किमत किती?

मुंबईची शान असलेल्या आणि देशातील प्रसिद्ध अशा ताज हॉटेलमध्ये साधारणपणे 350 रुपयांपासून चहाची किंमत सुरु होते. 350 रुपयांचा चहा हा ताज मधला साधा चहा आहे, पण तुम्ही हर्बल चहा, मसाला चहा किंवा नॅचरल चहा ऑर्डर करू शकता. 350 रुपयांपासून विविध प्रकारचे चहा आणि चहा कॉम्बो उपलब्ध आहेत. ताज हॉटेलमधील प्रसिद्ध लक्झरी चहा डिशची किंमत 1800 रुपयांपर्यंत आहे. टॅक्ससह या चहा कॉम्बोची किंमत 2124 रुपये होते. ‘बॉम हाई टी’ असे या चहाचे नाव आहे. ही एक चहा कॉम्बो आहे, ज्यामध्ये चहा सोबत वडा पाव, ग्रिल्ड सँडविच, काजू कतली आणि विविध प्रकारचे स्नॅक्स मिळतात.

रेटिंग काय?

आद्नान पठान या यूजर्सने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. आद्नानचे ताज हॉटेलमधून ‘बॉम हाई टी’ चहा घेतलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओत आद्नान ताज हॉटेलचा आतला भाग दाखवतो. हॉटेल पाहून मला किल्ल्यात असल्यासारखे वाटले, असं तो म्हणताना दिसतो. चहा घेतल्यावर तो म्हणतो, जीवनात कधी तरी हा अनुभव घ्याच. चहा आणि स्नॅक्स उपलब्ध असले तरी आद्नानच्या मते चहा बरा होता. त्याने या चहाला 5 पैकी 3 रेटिंग दिले आहेत. विशेष म्हणजे नेटिझन्सही त्याची ही रेटिंग्ज मान्य करत आहे.

दहशतवाद्यांचा हल्ला

गेटवे ऑफ इंडियाजवळ ताज महल पॅलेस किंवा ताज हॉटेल हे पंचतारांकित लक्झरी हॉटेल आहे. 1903 मध्ये जमशेदजी टाटा यांनी हे हॉटेल बांधले. या हॉटेलमध्ये 500 पेक्षा अधिक रूम्स आहेत आणि 1600 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे मुख्य केंद्र ताज हॉटेल होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी हा हल्ला झाला. हल्ला लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाने केला होता. हल्ल्यात 167 जणांचा मृत्यू झाला. तीन दिवस हा हल्ला सुरू होता. अखेर 29 नोव्हेंबर 2008 रोजी भारतीय लष्कराला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. काही यावेळी काही जवान शहीद झाले होते. त्यामध्ये माजी मेजर संदीप उन्निकृष्णन हे एक होते. हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमध्ये 450 हून अधिक लोक होते. त्यातले 31 जण हॉटेलमध्येच मरण पावले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल