धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांवर मोठा अन्याय – ओमप्रकाश राजे निंबाळकर

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांवर मोठा अन्याय – ओमप्रकाश राजे निंबाळकर

संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान रेल्वे संशोधन विधेयकावर चर्चा करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपदानाबाबत सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधेले.

रेल्वे संशोधन विधेयकावर चर्चा करताना ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले की, आज लोकसभेत धाराशिव- तुळजापूर -सोलापूर या नवीन रेल्वे मार्गात भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा पाचपटीने मोबदला देऊन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा अशी आज रेल्वे संशोधन विधेयकावर चर्चा करताना मागणी केली की, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर हा नवा रेल्वेमार्ग करण्यात येत आहे. या मार्गाची सुरुवातील घोषणा झाली तेव्हा थेट जमीन खरेदीद्वारे प्रकल्प करण्यात येणार होता. मात्र, 2022 मध्ये त्यात बदल करत सक्तीच्या भूसंपदानातून हा प्रकल्प केला जाणार आहे. थेट खरेदीद्वारे भूसंपादन झाले असते तर धाराशिव, तिळजापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांना फायदा झाला असता. त्यांना पाचपट मोबदला मिळाला असता. मात्र, आता सक्तीने भूसंपदान होणार असल्याने रेडी रेकनरच्या दराप्रमाणे मोबदला मिळत आहे. राज्यात जेवढे रेल्वेप्रकल्प झाले ते थेट खरेदीद्वारे वाटाघाटीद्वारे झाले. मात्र, राज्यातील आकांक्षित जिल्ह्यात आणि सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या जिल्ह्यात अशाप्रकारे सक्तीचे भूसंपादन होत असल्याने आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, या गोष्टीकडे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;