भाजपने रेल्वे स्टेशनची नावं बदलल्याचं श्रेय घेतलं, पण खरंच बदलली का? अरविंद सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न

भाजपने रेल्वे स्टेशनची नावं बदलल्याचं श्रेय घेतलं, पण खरंच बदलली का? अरविंद सावंत यांनी उपस्थित केला प्रश्न

”सत्ताधारी पक्षाने महाराष्ट्रात बोर्ड लावून रेल्वे स्टेशनची नावं बदलल्याचं श्रेय घेतलं, पण अजूनही कागदपत्रांवर जुनीच नाव दिसतं आहेत. मग नावं खरंच बदलली आहेत की नाही, असा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी आज संसदेत उपस्थित केला आहे. आज लोकसभेत रेल संशोधन विधेयक, 2024 वर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान त्यांनी रेल्वे खात्याकडील प्रलंबित मागण्यांची यादीही संसदेत सादर केली.

संसदेत बोलताना अरविंद सावंत यांनी रेल्वे सुरू करणाऱ्या नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांचे रेल्वे स्थानकास नाव देण्याची मागणी यावेळी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी त्यांनी केली. संसदेत बोलताना ते म्हणाले की, ”हिंदुस्थानात रेल्वे सुरु करणारे हे नाना शंकरशेठ होते. तुम्ही केवडिया स्टेशनचं नाव बदललं, यातच नाना शंकरशेठ यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन देण्यासाठी स्वतः राज्य सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने प्रस्ताव पास केला, तुम्हाला दिला, मात्र अजून त्याचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन देण्यात आलं नाही. यात तुम्हाला काय अडचण आहे, हे मला कळत नाही.”

सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी मी वारंवार करत आहे. तुम्ही केवडिया स्टेशनचं नाव बदललं, तिथे आदरणीय सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा आहे. मग येथे का नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाऊ शकत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय रेल्वेच्या मोकळ्या जमिनीवर वसलेल्या झोपड्यांचे पुनर्वसनासंदर्भात धोरण आणावं, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच रेल्वे बोर्डाच्या स्वायत्ततेबाबतही बोर्ड स्वतंत्र राहणार की, त्यात सरकारचा हस्तक्षेप राहणार, हा महत्त्वपूर्ण प्रश्नही अरविंद सावंत उपस्थित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;