मणिपूरच्या 9 जिल्ह्यांमध्ये 5 डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंदच!
मणिपूर सरकारने नऊ जिह्यांमधील मोबाईल इंटरनेटवरील बंदी 5 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, काकचिंग, बिष्णुपूर, थौबल, चुराचंदपूर, कांगपोकपी, फेरझॉल आणि जिरीबाममध्ये येत्या गुरुवारी संध्याकाळी 5.15 वाजेपर्यंत इंटरनेट बंद असेल, असे गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून मणिपूर धुमसतेय. जिरीबाम आणि बराक नद्यांमध्ये तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह आढळल्यानंतर राज्यात पुन्हा हिंसाचार उसळला. त्यामुळे
16 नोव्हेंबरपासून इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List