Mumbai Rain – हिवाळ्यात पावसाची रिप रिप, रस्त्यावर चिप चिप; नागरिकांची उडाली तारांबळ

Mumbai Rain – हिवाळ्यात पावसाची रिप रिप, रस्त्यावर चिप चिप; नागरिकांची उडाली तारांबळ

मुंबईत गेल्या आठवड्यात पारा घसरल्यानंतर थंडीची चाहूल लागली होती. मुंबईकरांनी पहाटेच्या वेळात स्वेटर परिधान करण्यास सुरुवात केली होती. आज मात्र उलटच घडले. रात्रीपासूनच ढग जमले होते आणि पहाटेच शहर आणि उपनगरातील काही भागात पावसाची रिप रिप सुरू झाली. हिवाळ्यात पावसाच्या आगमनाने मुंबईकर गोंधळले. पावसामुळे रस्त्यांवरील धूळ ओली होऊन चिप चिप झाल्याचं पाहायला मिळाले. यामुळे चिखलाचे डाग उडू नये, पाय घसरू नये अशा विचारात पायी चालणाऱ्या नोकरदारवर्गाचा वेग मंदावला. अनेकांना आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास उशीर होत असल्याचे चित्र सकाळी दिसत आहे.

तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळाने हाहाःकार माजवला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे कोकणातील हवामानातही बदल झाला असून मंगळवारी रत्नागिरीत दिवसभर ढगाळ वातावरण होते. चक्रीवादळाचा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने सरकत असून पुढील 2-3 दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. यामुळे कोकणात काही ठिकाणी हलका ते मध्यम पर्जन्यमान होण्याची शक्यता हवामान विभागाकडून आधीच वर्तविण्यात आलेली होती. तर मध्य महाराष्ट्रातही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता असल्याचे यात सांगण्यात आले आहे.

फोटो – गणेश पुराणिक

हा अंदाज आज खरा ठरला. दक्षिण हिंदुस्थानमध्ये धडकलेल्या फेंगल चक्रि‍वादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसू लागला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमधील थंडी गायब झाली असून आकाशात ढगांची गर्दी झाली आहे. त्यामुळे उकाडा प्रचंड वाढला असून बुधवारी सकाळी मुंबईतील काही भागांमध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. त्यामुळे ऐन थंडीमध्ये लोकांना स्वेटर ऐवजी छत्री बाहेर काढावी लागली.

सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या चाकरमान्यांची अचानक सुरू झालेल्या पावसांच्या सरींमुळे चांगलीच तारांबळ उडाली. पावसांच्या हलक्या सरींमुळे नागरिकांनी दुकाने, फ्लायओव्हरखाली आसरा घेतला. काहींनी डोक्यावर रुमाल, प्लास्टिकची पिशवी टाकून कामावर पोहोचण्यासाठी धाव घेतली. मात्र रस्त्यावर चिप चिप झाल्याने पाय घसरत होते, त्यामुळे चाकरमान्यांचा वेग मंदावला.

फोटो – गणेश पुराणिक

तापमानात वाढ

चक्रि‍वादळामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात दमटपणा वाढला आहे. पहाटेच्या सुमारास जाणवणारी थंडीही गायब झाली आहे. किमान आणि कमाल तापमानातही वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील दुपारचे तापमान कमाल 28, तर किमान 12 -14 पर्यंत पोहोचले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;