महाराष्ट्र निवडणूक निकालाची आकडेवारी जाहीर करा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट

महाराष्ट्र निवडणूक निकालाची आकडेवारी जाहीर करा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात ईव्हीएम मशिन्स हॅक करून मतांमध्ये फेरफार केल्याचा संशय महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे. यातच आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.

यावेळी महाराष्ट्र निवडणूक निकालाची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला केली. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, ”निवडणूक आयोगासमोर आम्ही आमचे विचार सविस्तरपणे मांडले आहेत. गंभीर मुद्द्यांवर डेटा प्रसिद्ध करायला हवा होता.”

निवडणूक आयोगासमोर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. याचबद्दल बोलताना माध्यमांशी संवाद साधताना अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं की, ”पहिला मुद्दा म्हणजे लाखो लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याबाबत आम्ही आयोगाला सांगितले की, याची सविस्तर माहिती द्यायला हवी, जेणेकरून नावे का व कशी काढली गेली हे कळू शकेल.”

ते म्हणाले, ”दुसरा मुद्दा होता मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे, कारण लोकसभा निवडणुकीनंतर सुमारे 47 लाख नवीन मतदारांची नावे समाविष्ट गेली आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे मतदानानंतर मतदानाची टक्केवारी सात टक्क्यांपर्यंत वाढवणे. आम्ही यासाठी डेटा मागितला आहे. कारण सात टक्के मते निवडणुकीचे संपूर्ण गणती बदलू शकते. आणखी एक मुद्दा म्हणजे एकूण 118 विधानसभा मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 25 हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील बहुतांश भागात भाजप आणि मित्रपक्षांनी बाजी मारली आहे.” आम्हाला आशा आहे की, याचं आम्हाला उत्तर मिळेल, जे पारदर्शक असेल आणि अविश्वास दूर होईल, असंही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;