मारकडवाडी निवडणूक प्रक्रिया : इलेक्शन कमिशन का घाबरले? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मारकडवाडी निवडणूक प्रक्रिया : इलेक्शन कमिशन का घाबरले? आदित्य ठाकरे यांचा सवाल

विधानसभा निवडणूकीत EVM ने दिलेल्या निकालाविरोधात आवाज उठवत माळशिरसमधील मारकडवाडी गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान आयोजित केले होते. मात्र पोलिसांनी मतदानाच्या दिवशी गावात कलम 144 लागू केले. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया गावकऱ्यांना रद्द करावी लागली. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फटकारले आहे.

”निवडणूक आयोग का घाबरले? की या येणाऱ्या सरकारने मारकडवाडीत कर्फ्यू लावण्याचे आदेश दिले आहेत. एक खोटं लपवण्यासाठी आणखी एक खोटं बोलंल जातंय. चोरलेला निकाल, हिंदुस्थानात कशाप्रकारे लोकशाहीची हत्या होतेय हे जग पाहतंय”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;