बांगलादेशच्या सीमेवर तणाव, आंदोलनकर्त्यांनी माल वाहतूक रोखली

बांगलादेशच्या सीमेवर तणाव, आंदोलनकर्त्यांनी माल वाहतूक रोखली

बांगलादेशात मागील काही काळापासून तणावाची स्थिती आहे. त्यामुळे त्यांचे हिंदुस्थानसोबतचे संबंधही बिघडले आहेत. हिंदूंवरील हिंसाचार, हिंदुस्थानी झेंडय़ाची अवहेलना आणि पुजारी तथा इस्कॉन पुंडलिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमुळे आणखी वातावरण चिघळले आहे. हिंदुस्थानी जनतेमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. सोमवारी पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात हिंदू संघटना, कार्यकर्ते, सामान्य नागरिक आणि भिक्षूंनी आंदोलन केले. बांगलादेशच्या सीमेवर पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी माल वाहतूक करणारे सर्व ट्रक अडवले. त्यामुळे बांगलादेशसोबतच्या व्यापारावर दिवसभर परिणाम झाला. कोणत्याही अटीशिवाय कृष्ण दास यांची सुटका करा, अशी मागणी करत आंदोलकांनी बांगलादेशच्या सीमेवरील माल वाहतूक 24 तास रोखून धरली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;