दिल्लीसाठी आपला महाराष्ट्र महत्त्वाचा नाही, सत्तास्थापनेच्या विलंबावरून आदित्य ठाकरे यांची टीका

दिल्लीसाठी आपला महाराष्ट्र महत्त्वाचा नाही, सत्तास्थापनेच्या विलंबावरून आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणूक आयोगाने महायुतीवर उपकार केले तर त्यांची सरकार स्थापन करण्याची त्यांची मानसिकता नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच दिल्लीसाठी महाराष्ट्र महत्त्वाचा नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून, महाराष्ट्रात अजूनही सरकार बनत नाहीये, याची दोनच कारणं असू शकतात. एक निवडणूक आयोगाने उपकार केले असले तरी सरकार बनवायची मानसिकता नाही. महाराष्ट्रच आहे ना… अपमान करूया, सरकार काही दिवसांनी बसवूया, कोण काय बोलणार आहे? ही दुसरी मानसिकता असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच एवढं संख्याबळ असूनही, महाराष्ट्रात हे अजून सरकार बसवू शकले नाहीत; कारण आपलं महाराष्ट्र राज्य त्यांना महत्वाचं नाहीये. महाराष्ट्राला दुर्लक्षित करा, महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करा आणि सरकारचं गठन प्रलंबित ठेवा; सध्या त्यांची हीच भूमिका दिसत आहे. बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे पण दिल्लीसाठी आपला महाराष्ट्र, आपलं राज्य महत्वाचं नाहीये, हे आता स्पष्ट दिसत आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;