भाजपने मनात आणलं तर मागणी करणाऱ्यांना चिरडून टाकतील – संजय राऊत

भाजपने मनात आणलं तर मागणी करणाऱ्यांना चिरडून टाकतील – संजय राऊत

राज्यातील सत्तास्थापनेवर बोलताना शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप मिंधेंना फटकारले आहे. ‘भाजप जगातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष, देशात मोदींसारखा मजबूत नेता आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांसारखा मजबूत नेता. असे असतानाही एका गृहमंत्रीपदावरून महाराष्ट्र राज्याचं सरकार लटकून पडलं आहे. बहुमत असतानाही पंधरा दिवस शपथ घेत नाही. त्यामुळे मला वाटतं की हे एका गृहमंत्रीपदावरून थांबलेलं नाही. भाजपने मनात आणलं तर समोरचे जे मागण्या करतायत त्यांना चिरडून टाकतील”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी उद्यापर्यंत सरकार स्थापनेबाबत उलगडा करा नाहीतर आम्ही आमची पुस्तकं उघडू, असा इशारा देखील भाजप मिंध्यांना दिला.

”भाजप जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष, मोदींसारखा मजबूत नेता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सारखा मजबूत नेता. असे असतानाही एका गृहमंत्रीपदावरून महाराष्ट्र राज्याचं सरकार लटकून पडलं आहे. तुमच्याकडे बहुमत आहे. तुमच्यासोबत अजित पवार आहेत. बहुमत असतानाही पंधरा दिवस शपथ घेत नाही. राज्याला सरकार देत नाही. समर्थक आमदारांची नावं द्यायला तयार नाही. राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलं नाही आणि तुम्ही मांडव घातला. काय प्रकार आहे हा. हे एका गृहमंत्रीपदावरून थांबलेलं नाही. भाजपने मनात आणलं तर समोरचे जे मागण्या करतायत त्यांना चिरडून टाकतील. ते काही स्वबळावर निवडून आलेले नाही. ते कसे निवडून आले ते भाजपला माहित नाही. एका गृहमंत्रीपदावरून हे सरकार लटकलेलं नाही. अनेक राज्यात भाजपने सरकार बनवली आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन मुख्यमंत्री आणले आहेत. वेगळं काही समिकरण आहे का? फडणवीसांच्या जागी कोण येतंय का? उद्या पर्यंत या सर्वाचा उलगडायला हवा नाहीतर आम्ही आमची पुस्तकं उघडू, असे संजय राऊत म्हणाले.

”एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद यासाठी हवंय की त्यांनी याआधी पोलीस यंत्रणा वापरून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. दहशत निर्माण केली. यंत्रणेचा वापर करून त्यांनी निवडणूक लढवली. हीच यंत्रणा वापरून ते भाजपच्या अंगावर जाऊ शकतात ही त्यांची विकृती आहे. दुसऱ्या क्रमांकाचं खातं गृहखातं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ते खातं कायम स्वत:कडे ठेवलेलं आहे. ते नेहमी असे म्हणायचे की गृहखातं उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे द्यायला नको होतं. जर गृहखातं व विधानसभेचं अध्यक्षपद आमच्याकडे असतं तर आमचं सरकार पडलंच नसतं, असं संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;