भाचा कृष्णासोबत का झाला होता वाद? गोविंदाने पहिल्यांदाच सोडलं मौन

भाचा कृष्णासोबत का झाला होता वाद? गोविंदाने पहिल्यांदाच सोडलं मौन

सुपरस्टार गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद जगजाहीर आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या कुटुंबीयांनी अबोला धरला होता. अखेर काही दिवसांपूर्वी जेव्हा गोविंदाच्या पायाला गोळी लागली, तेव्हा कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाहने विचारपूस करत हा वाद मिटवला. त्यानंतर गोविंदाने कृष्णाच्या कॉमेडी शोमध्येही हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनी एकमेकांना मिठी मारत वाद मिटल्याचे संकेत दिले. यावेळी गोविंदाने नेमका काय वाद होता, याविषयी स्पष्टपणे सांगितलं. 2016 मध्ये कृष्णाच्या एका विनोदावरून या वादाची सुरुवात झाली होती.

कृष्णासोबतच्या वादाबद्दल गोविंदा म्हणाला, “आता मी खरं काय ते बोलून टाकतो. एकेदिवशी मी त्याच्यावर खूप चिडलो होतो. त्याला असे कसे डायलॉग्स बोलायला देतात, असं मी भडकून म्हणालो. त्यावर माझी पत्नी सुनिता मला समजावत म्हणाली, संपूर्ण इंडस्ट्री हेच करतेय. तुम्ही कृष्णाला काही बोलू नका. तो त्यातून पैसे कमावतोय आणि त्याला ते काम करू द्या. तुम्ही कोणाला थांबवू नका, कोणाशी चुकीचं वागू नका. त्यामुळे तू तिची माफी माग, ती तुझ्यावर खूप प्रेम करते.” मामाचं हे बोलणं ऐकताच कृष्णा म्हणतो, “हो हो.. माझंही मामीवर खूप प्रेम आहे. तरी माझ्याकडून काही चूक झाल्यास मी त्यांची माफी मागतो. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णा म्हणाला होता, “बऱ्याच काळानंतर मला इतका चांगला अनुभव आला. मी स्टेजवरच म्हणालो की माझा सात वर्षांचा वनवास संपला आहे. आम्ही आता एकत्र आहोत. आम्ही नाचलो, हसलो आणि खूप मजा केली.” काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. तेव्हा कृष्णा त्याची भेट घेऊ शकला नव्हता. याविषयी तो पुढे म्हणाला, “मामाच्या पायाला दुखापत झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यावेळी मी सिडनीमध्ये होतो आणि मी माझ्या आयोजकांनाही शो रद्द करण्याची विनंती केली होती. पण माझी पत्नी कश्मिरा इथे होती आणि सर्वांत आधी तिनेच रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी गोविंदा मामासुद्धा तिच्याशी खूप चांगलं वागले. रक्ताच्या नाती या शेवटी रक्ताच्याच नाती असतात. त्यांची प्रकृतीही आता ठीक आहे आणि आता ते नाचूही शकतायत.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;