दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घाला! मोहन भागवत यांचे आवाहन

दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घाला! मोहन भागवत यांचे आवाहन

जन्मदर 2.1 असल्यास तो समाज पृथ्वीवरून नष्ट होतो, असे मत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे दाम्पत्यांनी दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घालावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, लोकसंख्या कमी होणे ही गंभीर बाब आहे. आधुनिक लोकसंख्याशास्त्रानुसार जेव्हा जन्मदर 2.1 पेक्षा कमी होतो याचा अर्थ पृथ्वीवरून तो समाज नष्ट होण्याची शक्यता असते. कुठलेही संकट नसताना तो समाज नष्ट होऊ शकतो. लोकसंख्या नसल्याने अनेक समाज आणि अनेक भाषा नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे जन्मदर 2.1 पेक्षा कमी होता कामा नये. 1998 किंवा 2002 साली आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण ठरलं. त्यात कुठल्याही समाजाचा जन्मदर हा 2.1 पेक्षा कमी असता कामा नये, असे ठरवण्यात आले होते. त्यामुळे कुठल्याही दाम्पत्याला दोन किंवा तीनपेक्षा अधिक अपत्य असायला हवीत. हेच लोकसंख्याशास्त्रात म्हटले आहे. समाजासाठी एवढी लोकसंख्या हवी, असेही भागवत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;