चक्रीवादळाच्या प्रभावाने बळीराजा चिंतेत, कापूस, तूर पिक संकटात

चक्रीवादळाच्या प्रभावाने बळीराजा चिंतेत, कापूस, तूर पिक संकटात

फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप पाऊस पडल्याने धानाचे पूंजने वाचवण्यासाठी बळीराजाची धावाधाव झाली होती. सद्या शेतात कापूस, तुर, हरबरा,पिक उभे आहेत. ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावर संकट ओढवले, तुरीला फुलोरा आला आहे. पावसामुळे फुलोरा गळण्याचा धोका उदभवाला असून अळीचा धोका वाढला आहे. मोठा पाऊस झाला तर कापूस काळा पडण्याचा धोका निर्माण आहे, एकीकडे कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना अशी स्थिती तर दुसरीकडे अस्मानी संकट. या दोन्ही संकटाचा सामना करताना बळीराजा हतबल झाला आहे. पावसापासून धानाचे पुंजने वाचवण्यासाठी बळीराजा रात्र जागून काढत आहे. कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांचा शोधात बळीराजा गावोगावी भटकताना दिसत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;