चक्रीवादळाच्या प्रभावाने बळीराजा चिंतेत, कापूस, तूर पिक संकटात
फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप पाऊस पडल्याने धानाचे पूंजने वाचवण्यासाठी बळीराजाची धावाधाव झाली होती. सद्या शेतात कापूस, तुर, हरबरा,पिक उभे आहेत. ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावर संकट ओढवले, तुरीला फुलोरा आला आहे. पावसामुळे फुलोरा गळण्याचा धोका उदभवाला असून अळीचा धोका वाढला आहे. मोठा पाऊस झाला तर कापूस काळा पडण्याचा धोका निर्माण आहे, एकीकडे कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना अशी स्थिती तर दुसरीकडे अस्मानी संकट. या दोन्ही संकटाचा सामना करताना बळीराजा हतबल झाला आहे. पावसापासून धानाचे पुंजने वाचवण्यासाठी बळीराजा रात्र जागून काढत आहे. कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांचा शोधात बळीराजा गावोगावी भटकताना दिसत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List