देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, विद्या चव्हाण यांची टीका

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, विद्या चव्हाण यांची टीका

भाजप हिंदू मुस्लिम करून मतं मिळवत आहे असा अरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळलीअशी टीकाही चव्हाण यांनी केली.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, राज्यात कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही फडणवीस योग्य कारभार सांभाळत नाहीत. फडणवीस हिंदु मुस्लिम करून मतं मिळवत आहेत. त्यामुळेच त्यांनी बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है सारख्या घोषणा दिल्या होत्या. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही निती अवलंबली होती तसेच भाजपही ही निती अवलंबित आहे असेही चव्हाण म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;