‘यांच्या खेळात राज्याचा खोळंबा’, सत्ता स्थापनेच्या गोंधळावर रोहित पवार यांची महायुतीवर टीका
सरकार स्थापनेवरून राज्यात सध्या महायुतीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप महायुतीने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. आता याच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर टीका केली आहे.
‘एक्स’वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, ”निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला सरकार बनवण्याची वेळ आली असती, तर विधानसभेची मुदत संपताच 26 नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असती. तसेच पडद्यामागून महाशक्तीने सरकार चालवले असते.”
ते पुढे म्हणाले, ”मात्र आज निकाल लागून 8 दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही. पण यांच्या खेळात राज्याचा मात्र खोळंबा होतोय, याचं महायुतीला काहीही देणंघेणं नाही, हे दुर्दैवी आहे.”
निवडणुकीनंतर #मविआ ला सरकार बनवण्याची वेळ आली असती तर विधानसभेची मुदत संपताच २६ नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावून पडद्यामागून #महाशक्तीने सरकार चालवले असते…. पण आज निकाल लागून ८ दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही.. पण यांच्या खेळात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 30, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List