भाजप मित्रपक्ष म्हणून गळ्यात हात घालतो आणि गळफास होतो! राजकीय विश्लेषकांचं मत

भाजप मित्रपक्ष म्हणून गळ्यात हात घालतो आणि गळफास होतो! राजकीय विश्लेषकांचं मत

भाजपसोबत युती केल्यानंतर मित्रपक्ष संपतो, भाजपने केंद्रात जीएसटी आणून राज्यांची आर्थिक कोंडी केली, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. तसेच भाजप मित्रपत्रक्ष म्हणून गळ्यात हात घालतो आणि गळफास होतो, असेही मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी आपली मतं मांडली. यात चर्चेत म्हटलं गेलं की, भाजपने पंजाबमध्ये अकाली दलसोबत मैत्री केली होती. आसाममध्ये असम गण परिषद, ओरिसात बिजू जनता दल, गोव्यात महाराष्ट्रावादी गोमंतक पक्षाचं झालं आणि महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जे झालं हे जगजाहीर आहे. अकाली दलला आता नेतृत्व नाही. ओरिसामध्ये बिजू जनता दल हा सत्ताधारी पक्ष होता. त्याला दोन आकडीही जागा मिळाल्या नाहीत. गोव्यात भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी मैत्री केली होती. त्या पक्षाचं नावही आता लोकांना माहित नाही. भाजपने आधी जे शिवसेनेसोबत केलं ते आता मिंधे गटासोबतही करणार, असेही विश्लेषक म्हणाले. भाजप प्रेमाने गळ्यात हात घालतो आणि राजकीयदृष्ट्या त्याचा गळफास होतो हे देशपातळीवर सिद्ध झाले आहे, असेही मुद्दे या चर्चेत मांडले गेले.

राज्यांची आर्थिक कोंडी
भाजप केंद्रात आल्यानंतर जीएसटी कायदा आणला. त्यानंतर भाजपप्रणित केंद्र सरकराने सर्व राज्यांची आर्थिक कोंडी केली. जीएसटी आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री हे फक्त कारकून झाले आहेत, असे राजकीय विश्लेषकांनी म्हणाले. युपीए काळात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विरोध केला होता. मोदींनी ईव्हीएमलाही विरोध केला होता. जेव्हा मोदी सत्तेवर आले तेव्हा जीएसटीचा ढाचाच बदलला, असेही त्यांनी नमूद केले. लोकसत्ताच्या युट्युब चॅनेलच्या एका कार्यक्रमात पत्रकारांनी आपली मते मांडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;