बिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या; महाराष्ट्रातील मतांच्या घोळावरून लालू प्रसाद यादव यांची मोठी मागणी

बिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या; महाराष्ट्रातील मतांच्या घोळावरून लालू प्रसाद यादव यांची मोठी मागणी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. पण सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय. मतं वाढवल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मोठी मागणी केली आहे. बिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.

दिल्लीत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना लालू प्रसाद यादव म्हणाले की, पुढच्या वर्षी बिहारमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा विजय होईल. आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक ही मतपत्रिकेवर घ्यावी, अशी मागणीही लालू प्रसाद यादव यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;