कुनो अभयारण्यातून वाईट बातमी, निरवा मादीच्या बछड्यांचा मृत्यू
कुनोच्या अभयारण्यातून दोन दिवसांपूर्वीच मादी चित्ता निरवाने दोन बछड्यांचा जन्म दिल्याची बातमी समोर आली होती. या बातमीने आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र या आनंदावर अवघ्या दोन दिवसातच विरझण पसरले आहे. बुधवारी त्या बछड्यांचे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत सापडले आहेत. गुरुवारी या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून निरवा मादीनेच बछड्यांवर हल्ला केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कुनो व्यवस्थापनाने बुधवारी रात्री जारी केलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मादी चित्ता निरवाच्या रेडिओ टेलिमेट्रीच्या माहितीच्या आधारे निरवा गुहेच्या ठिकाणापासून दूर असताना डेन साइटला भेट देण्यात आली. वन्यजीव डॉक्टरांच्या नेतृत्वात निरीक्षण पथकाने पाहणी केली. गुहेच्या ठिकाणी दोन नवजात चित्ताच्या बछड्यांचे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आले. चित्त्याच्या बछड्यांचे नमुने घेण्यात आले असून ते आगाऊ तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
निरवाने केवळ 2 बछड्यांना जन्म दिला, त्यानंतर बुधवारी निरीक्षण पथक आणि डॉक्टरांनी सर्व संभाव्य ठिकाणांची पाहणी केल्यानंतर, इतर कोणत्याही चित्त्याचा पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे निरवाने केवळ 2 बछड्यांना जन्म दिला असावा, असे मानले जात आहे. व्यवस्थापनाने सांगितले की, मादी चित्ता निरवा निरोगी आहे, तर उर्वरित सर्व प्रौढ चित्ता आणि 12 बछडे निरोगी आहेत. सोमवारी निरवा मादी चित्त्याने बछड्यांना जन्म दिल्याची बातमी समोर आली होती. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी एक्स पोस्टवर माहिती दिली आहे, मात्र त्यात बछड्यांच्या संख्येचा उल्लेख केलेला नव्हता.
निरवाच्या गुहेजवळ दोन बछड्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर अन्य बछड्यांची काही माहिती मिळालेली नाही. त्या अन्य भागात अन्य कोणताही प्राणी नाही. त्यामुळे अन्य कोणत्या प्राण्याच्या हल्ल्यात बछड्यांचा मृत्यू होणे शक्य नाही. अशावेळी निरवानेच तिच्या बछड्यांवर हल्ला केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहेत.
-उत्तम कुमार शर्मा, संचालक, चीता प्रोजेक्ट कूनो
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List