महाराष्ट्राचे भविष्य दिल्ली ठरवणार; 200 पेक्षा जास्त जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद लटकून पडलंय! – संजय राऊत

महाराष्ट्राचे भविष्य दिल्ली ठरवणार; 200 पेक्षा जास्त जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद लटकून पडलंय! – संजय राऊत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 6 दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार हे निश्चित झालेले नाही. 200 पेक्षा अधिक जागा जिंकलेल्या महायुतीला त्यांचा मुख्यमंत्री ठरवता येत नाही. मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे बहुमत त्यांना आहे. युतीतील 2 पक्षांनीही सर्वाधिकार दिल्लीला दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्य दिल्ली ठरवणार आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपला 130 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. जवळजवळ पूर्ण बहुमत असतानासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद असे का लटकून पडले हे कळत नाही. अर्थात जनतेला त्यात इंटरेस्ट नाही, कारण हा जनतेचा कौल नाही. तीन पक्षांना पाशवी बहुमत असतानाही राज्यात सरकार नाही. विधानसभेची मुदतही 26 नोव्हेंबरला संपलेली आहे. याठिकाणी आम्ही असतो तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवले असते. पण नियम कायदे फक्त विरोधी पक्षासाठी, बहुमत प्राप्त झालेल्या महायुतीला नाही, असे राऊत म्हणाले.

मिंधेंनी यापुढे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये; संजय राऊत कडाडले

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागत आहे. कारण मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री हा एका पक्षाचा नसतो, तर तो देशाचा, राज्याचा असतो. पण भाजप सत्तेत आल्यापासून पंतप्रधान, मुख्यमंत्री हे एका पक्षाचे झाले. पण फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा विचार केला तर नक्कीच आम्ही काळजीपूर्वक पाहू, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;