निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत कशावरही जनतेचा विश्वास नाही! – संजय राऊत

निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत कशावरही जनतेचा विश्वास नाही! – संजय राऊत

राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड शब्दात भाष्य केले आहे.

निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवले होते. विधानसभेची निवडणूक होईपर्यंत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. पण जो व्यक्ती नि:पक्ष नाही, त्याला कायमचे हटवले पाहिजे अशी आमची मागणी होती. रश्मी शुक्ला यांची नियुक्तीही बेकायदेशीर असून याबाबत आम्ही विधानसभेत आणि बाहेरही आवाज उठवला. पण पाशवी बहुमताचे सरकार आल्यावर अशा प्रकारची नियुक्ती कोण रोखू शकते, असे संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, तेलंगणामध्ये निकाल लागताच तिकडले पोलीस महासंचालक रेवंत रेड्डी यांना भेटले होते. निवडणूक आयोगाने त्यांना तत्काळ बडतर्फ केले होते. पण परवापासून महाराष्ट्रातील काही अधिकारी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना भेटत असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. एका राज्याला एक न्याय आणि दुसऱ्या राज्याला दुसरा न्याय. जे राज्य भाजपबरोबर आहे तिथल्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि जे राज्य भाजपबरोबर नाही तिथल्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय, असा निवडणूक आयोगाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोणावरही जनतेचा विश्वास राहिलेला नाही, अशा प्रकारचे वातावरण महाराष्ट्र आणि देशात निर्माण झालेले आहे.

खरेदी-विक्रीत भाजप माहीर; शिंदे-अजित पवारांचा पक्षही फोडू शकतात, संजय राऊत यांनी घेतला समाचार

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेमध्ये गौतम अदानी यांचा विषय काढल्यावर कामकाज स्थगित करण्यात आले. यावरूनही संजय राऊत यांनी सरकारचा समाचार घेतला. संसदेमध्ये अदानीवर बोलू दिले जात नाही. अदानी तुमचा कोण लागतो? खरगे संसदेत बोलायला उभे राहिले, त्यांनी अदानीचे नाव घेण्यापूर्वीच अध्यक्षांनी कामगाज स्थगित केले. हा कोणता न्याय, ही कोणती लोकशआही? अदानी कोण आहे? भगवान आहे, विष्णूचा अवतार आहे, क्रांतिकारक आहे की त्यांनी आणीबाणीत तुरुंगवास भोगला? अदानी हे टाटा, बिर्ला नाहीत. अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अमेरिकेने वॉरंट काढले आहे. त्यांच्यावर संसदेत प्रश्न उपस्थित केले तर मोदी-शहांचे सरकार त्यावर बोलू का देत नाही? असा सवाल राऊत यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;