जीपीएसवर अवलंबून राहणे भोवले, भरधाव कार थेट नदीत कोसळली, तिघांचा मृत्यू

जीपीएसवर अवलंबून राहणे भोवले, भरधाव कार थेट नदीत कोसळली, तिघांचा मृत्यू

टेक्नोलॉजीच्या जिवावर अवलंबून राहणे चांगले, परंतु कधीकधी ते धोक्याचे ठरते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जीपीएसच्या जिवावर भरधाव कार चालवणे तीन मित्रांना भोवले आहे. त्यांची कार थेट अर्धवट पुलावर गेली आणि पूल संपल्यानंतर थेट नदीत पडली. या विचित्र अपघातात कारमधील तिघे जण ठार झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील खालपूर दातागंज मार्गावर घडली. या कारमधील तरुण बरेलीहून बदायू जिह्यातील दातागंज येथे एका लग्नसोहळ्याला जात होते. एका बांधकाम अर्धवट असलेल्या पुलावर कार गेली आणि पूल संपल्यानंतर थेट रामगंगा नदीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. कारचा चालक नेव्हिगेशन सिस्टिमचा वापर करत होता, असे पोलिसांनी सांगितले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;