उत्तर प्रदेशातील हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश, संभल हिंसाचारातील मृतांचा आकडा चारवर

उत्तर प्रदेशातील हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश, संभल हिंसाचारातील मृतांचा आकडा चारवर

उत्तर प्रदेशातील संभल येथे मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारात गोळ्या लागून ठार झालेल्यांचा आकडा 4 वर गेला आहे. शवविच्छेदन अहवालात गोळी देशी बनावटीच्या पिस्तुलातून चालवण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा मुराबादचे आयुक्त अंजनेय कुमार यांनी केला आहे. या चारही मृत्यूंची दंडाधिकारी चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रकरणी शाही जामा मशिदीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडण्यात आली. हिंसाचाराचा मुद्दा शांत होत होता. परंतु, सीओने मशिदीच्या टाकीतून पाणी काढल्याचे सांगितले. हे पाणी मशिदीतून बाहेर पडताच बघ्यांची गर्दी जमली. मी सीओंना याबाबतच विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केली आणि लाठीमार केला. जास्त प्रश्न विचारले तर जड जाईल, अशी धमकी दिली, असे शाही जामा मशिदीचे सदर जफर अली यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे संभलमध्ये पुन्हा तणाव वाढला असून पोलिसांचा फौजफाटा आणखी वाढवण्यात आला आहे.

 सपा खासदाराविरोधात हिंसा भडकावल्याचा गुन्हा

पोलिसांनी सपा खासदार झियाउर रहमान बर्के आणि आमदार नवाब इक्बाल महमूद यांचा मुलगा सुहेल इक्बाल यांच्याविरोधात हिंसा भडकावल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतर देशभरात मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप बुर्के यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी हिंसाचाराशी संबंधित 7 एफआयआर नोंदवले असून यात 6 जणांची नावे आहेत तर 25000 हून अधिक अज्ञातांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या चारही तरुणांवर पोस्टमॉर्टमनंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

 हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सत्तेचा वापर – राहुल गांधी

हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि भेदभाव निर्माण करण्यासाठीच भाजप सत्तेचा वापर करत आहे. अशाप्रकारे सत्तेचा वापर राज्याच्या किंवा देशाच्या हिताचा नाही. त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी विनंती मी सर्वोच्च न्यायालयाला करतो, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संभल हिंसाचार प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. संभलबाबत योगी सरकारची पक्षपाती आणि उतावीळ वृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्यांनी आपल्या नातेवाईकांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. प्रशासनाने सर्व पक्षांचे म्हणणे न ऐकता आणि असंवेदनशीलता बाळगत केलेल्या कारवाईमुळे वातावरण आणखी चिघळले असून यासाठी भाजप सरकारच थेट जाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;