मिंधे मुख्यमंत्री झाले तर जिंकलेले 133 जण काय करणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मिंधे मुख्यमंत्री झाले तर जिंकलेले 133 जण काय करणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी विधानभवनात गेले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालो आहोत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी निकालनंतर 48 तास उलटल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरत नाही आणि पत्रकार विरोधी पक्षनेत्याबाबत विचारत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच मिंधे मुख्यमंत्री झाले तर जिंकलेले 133 जण काय करणार, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू झालो आहोत. प्रत्येकवेळी बोलायचे म्हणून काहीही बोलायचे याला काही अर्थ नसतो. त्यामुळे मिंधे गटाच्या नेत्यांनी आरोप करताना, टीका करताना मर्यादा आणि पातळी याचे भान ठेवावे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. जो काही घोळ करून त्यांनी विजय मिळवला आहे, त्याची मजा घ्या, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक पदसंख्या आणि विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करणार का, याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर आम्ही त्याबाबत बोलू आणि आमची भूमिका स्पष्ट करू. त्यावर आताच बोलणे योग्य होणार नाही. पत्रकार विरोधी पक्षनेत्याबाबत विचारत आहेत. मात्र, तुम्हा पत्रकारांना मुख्यमंत्री कोण हे समजले का, असा सवालही त्यांनी केला. निकाल जाहीर होऊन 48 तास उलटल्यानंतरही त्यांचा निर्णय होत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होईपर्यंत मिंध्यांना मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी काही जणांनी केली आहे, असे पत्रकारांनी सांगितले. त्यावर ज्यांचे 133 आमदार निवडून आले आहेत, ते काय करणार? गेल्या अडीच वर्षात काहीही मिळाले नाही, तसेच बसणार का? तसेच हे 133 कोणत्या मतांना निवडून आले आहेत, तेदेखील जनतेला समजणे गरजेचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;