घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने ऐश्वर्याबद्दल केलं वक्तव्य; म्हणाला “त्या एका गोष्टीसाठी मी तिचे..”

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने ऐश्वर्याबद्दल केलं वक्तव्य; म्हणाला “त्या एका गोष्टीसाठी मी तिचे..”

अभिषेक बच्चनचा ‘आय वाँट टू टॉक’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट भरघोस कमाई करण्यात अपयशी ठरत असला तरी समिक्षकांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या चित्रपटात एका आजारी पित्याची त्याच्या मुलीसोबत असलेल्या गुंतागुतीच्या नात्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपटानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक त्याच्या खऱ्या आयुष्यातील मुलीबद्दल मोकळेपणे व्य क्त झाला. यावेळी त्याने पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचेही आभार मानले. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अभिषेकने ऐश्वर्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “माझ्या जन्मानंतर आईने अभिनयक्षेत्रात काम करणं थांबवलं होतं. कारण तिला तिच्या मुलाबाळांसोबत अधिक वेळ घालवायचा होता. त्यामुळे बाबांच्या अनुपस्थितीची आम्हाला फार जाणीव झाली नाही.” आईबद्दल सांगतानाच अभिषेकने पुढे पत्नीचा उल्लेख केला. “माझ्या घरात मी स्वत:ला नशिबवान समजतो कारण मला बाहेर पडून चित्रपटांमध्ये काम करायला मिळतंय. पण मला माहित आहे की ऐश्वर्या घरी आराध्यासोबत असते आणि त्यासाठी मी तिचे मनापासून आभार मानतो. पण मला वाटत की मुलं या दृष्टीकोनातून याकडे पाहतात. ते आपल्याकडे तिसरी व्यक्ती म्हणून नाही तर त्यांच्या आयुष्यातील पहिली व्यक्ती म्हणून पाहतात”, असं तो पुढे म्हणाला.

एक पिता म्हणून आपला अनुभव सांगताना अभिषेक पुढे म्हणाला, “तुमची मुलं तुम्हाला खूप प्रेरणा देतात. तुमच्या बाळासाठी तुम्ही गरज पडल्यास एका पायावरही पर्वत चढू शकता. मी हे सर्व महिला आणि मातांप्रती असलेल्या आदरामुळे बोलतोय. कारण ते जे करतात ते कोणीही करू शकत नाही. पण एक पिता ते सर्व शांतपणे करतो कारण त्याला ते कसं व्यक्त करावं किंवा प्रदर्शित करावं हे माहित नसतं. पुरुषांमध्ये हा एक दोष आहे. पण मुलं जसजशी मोठी होतात, तसतसं त्यांना वडिलांच्या दृढ स्वभावाबद्दल समजत जातं.”

लहानपणी वडील अमिताभ बच्चन यांनीसुद्धा मुलासाठी त्याग केल्याचं अभिषेकने या मुलाखतीत सांगितलं. “लहानपणी माझी आणि वडिलांची भेट काही आठवडे व्हायची नाही. ते माझ्या बाजूच्याच रुममध्ये झोपायचे. माझ्या आणि माझ्या बहिणीच्या रुमचा दरवाजा आणि मास्टर बेडरुमचा दरवाजा नेहमीच उघडा असायचा. आम्ही झोपल्यावर ते घरी परतायचे आणि आम्ही उठायच्या आधीच ते कामावर निघून जायचे. त्यांचं इतकं व्यग्र वेळापत्रक असतानाही मला शाळेतला असा एकही वार्षित दिवस किंवा बास्केटबॉल फायनल्स आठवत नाही, जेव्हा ते उपस्थित नव्हते. दिवसाअखेर ते नेहमी आमच्यासाठी हजर असायचे”, अशा शब्दांत अभिषेकने आठवण सांगितली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;