यापुढील निवडणुका फक्त अर्थकारणावरच होणार, जय EVM; जितेंद्र आव्हाड यांची टीका

यापुढील निवडणुका फक्त अर्थकारणावरच होणार, जय EVM; जितेंद्र आव्हाड यांची टीका

आता यापुढील निवडणुका फक्त अर्थकारणावरच होणार असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. असे म्हणत जय ईव्हीएम असेही आव्हाड म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून आव्हाड म्हणाले की, विचारधारा वगैरे आता विसरायला हवं. यापुढील निवडणुका फक्त अर्थकारणावरच होणार आहेत; किंबहुना त्या आर्थिक ताकदीवरच लढल्या जातील, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याचा आर्थिक पुरवठा मजबूत तोच निवडणुकीत टिकेल. आता शिव, फुले, शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र फक्त बोलण्यापुरताच उरलाय असे आव्हाड म्हणाले.

निकालाच्या दिवशी सकाळी 9 वाजता महाविकास आघाडी 137 जागांवर पुढे होती. पण साडे अकरा वाजता मविआ केवळ 53 जागांवर पुढे होती. टीव्हीवरील या कलाचा एक फोटो पोस्ट करून आव्हाड यांनी जय ईव्हीएम असे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;