संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेता गरजेचाच! – अॅड. उल्हास बाप
हिंदुस्थानात संसदीय लोकशाही असून, एक पार्टी सत्ताधारी, तर दुसरी ही विरोधक आहे. विरोधी पक्षनेता हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे जर संसदीय लोकशाही टिकवून ठेवायची असेल, तर विरोधी पक्षनेता असणे अत्यंत गरजेचे आहे. विरोधी पक्षनेता नसेल तर आपण संसदीय लोकशाहीपासून दूर जाऊ, असे परखड मत ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. उल्हास बापट यांनी व्यक्त केले. विधानसभेचे अध्यक्ष आणि सत्ताधाऱयांनी ठरवले तर राज्याला विरोधी पक्षनेता मिळू शकतो, असेही ते म्हणाले.
बापट म्हणाले, देशात पेंद्रात आणि राज्यात संसदीय लोकशाही आहे. एक सत्ताधारी, तर दुसरी विरोधी पार्टी असते. मात्र, हिंदुस्थानात बहुपक्षीय पद्धत असल्याने छोटे-छोटे पक्ष निर्माण होतात. त्यामुळे ते एक दशांशपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकत नाही. गेल्या वेळी राहुल गांधींच्या बाबतीत हेच झालं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List