‘लग्न-बिग्न तर बेकारचं काम..’; शबाना यांच्यासोबतच्या नात्यावर जावेद अख्तर असं का म्हणाले?

‘लग्न-बिग्न तर बेकारचं काम..’; शबाना यांच्यासोबतच्या नात्यावर जावेद अख्तर असं का म्हणाले?

ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबतच्या लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. लग्नसंस्थेकडे फारसं गांभीर्याने पाहत नसल्याचं म्हणतानाच जावेद यांनी नमूद केलं की प्रत्येक नात्याचा गाभा हा एकमेकांविषयी असलेला आदर असतो. ते म्हणाले की लग्न ही संकल्पना इतकी जुनी आहे की त्यावर गेल्या काही वर्षांत बराच कचरा जमा झाला आहे. यावेळी स्वत:च्या नात्याचं उदाहरण देताना त्यांनी स्पष्ट केलं की शबानासोबत त्यांचं नातं केवळ विवाहित जोडप्याचं नाही तर मैत्रीचं अधिक आहे. या दोघांनी 1984 मध्ये एकमेकांशी लग्न केलं. त्यावेळी जावेद हे पहिली पत्नी हनी इराणीशी विवाहित होते.

बरखा दत्त यांच्या ‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीत जावेद यांना शबाना यांच्यासोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “खरं सांगायचं झाल्यास, आम्ही विवाहित जोडपं म्हणून कमी आणि मित्र म्हणून जास्त वावरतो. चांगल्या लग्नासाठी माझी एकमेव पात्रता हीच आहे की तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहात की नाहीत? लग्न-बिग्न तर बेकारचं काम आहे. ही खूप शतकं जुनी परंपरा आहे. हे एका दगडासारखं हे जे शतकांपासून पर्वतावरून घरंगळत खाली येतंय. विशेष म्हणजे हे दगड खाली घरंगळत येताना, आपल्यासोबत खूप कचरा, घाण घेऊन येतंय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18)

“पत्नी आणि पती या दोन्ही शब्दांचे अनेक भिन्न अर्थ निर्माण झाले आहेत. तुम्ही हे सर्व विसरून जात. मला सांगा दोन व्यक्ती, त्यांचं लिंग काहीही असो, ते एकत्र आनंदाने कसे राहू शकतात? त्यासाठी परस्पर आदराची गरज आहे. त्यासाठी एकमेकांचा विचार करण्याची गरज आहे, एकमेकांना मोकळं वातावरण देण्याची गरज आहे. लोकांनी हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की त्यांचा जोडीदार हा जोडीदाराशिवाय स्वत: एक स्वतंत्र व्यक्ती आहे. ती व्यक्तीसुद्धा माणूस आहे आणि त्या व्यक्तीचेही स्वप्न, ध्येय आहेत, हे समजून घ्यायला हवं. तुमचा स्वत:च्या ध्येयावर जेवढा हक्क असतो, तेवढाच त्यांचा त्यांच्या ध्येयावर असतो. इतकंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ही काही फार मोठी गोष्ट नाही. उलट हे समजून घेणं खूप सोपं आहे. जर तुम्ही दोघं खुश असाल तरच तुम्ही एकत्र खुश राहू शकता”, असं ते पुढे म्हणाले.

आदराशिवाय असलेलं प्रेम म्हणजे फसवणूक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. “एक स्वतंत्र स्त्री, जिच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षा, स्वत:चा व्यवसाय, स्वत:ची मतं असतात, ती फार सोयीची व्यक्ती मानली जात नाही. साहजिकच तुमच्यासोबत राहणारी आणि तुमचा गुलाम नसलेली व्यक्ती गैरसोयीची वाटू शकते. पण ते तुमचे गुलाम नाहीत हे समजून घ्यायला हवं”, असं मत अख्तर यांनी यावेळी मांडलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;