EVM हटाव लोकशाही बचाव! भाजपने लोकशाहीचा खून केला, बच्चू कडू यांचा हल्लाबोल

EVM हटाव लोकशाही बचाव! भाजपने लोकशाहीचा खून केला, बच्चू कडू यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महायुतीने 200 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक अनाकलनीय निकाल लागले. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यासारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. तर विदर्भात अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनाही पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या प्रवीण तायडे यांनी त्यांना 12,131 मतांनी पराभूत केले.

पराभवानंतर बच्चू कडू यांनी एक ट्विट करत भाजपवर हल्ला चढवला. भाजपने लोकशाहीचा खून केल्याची टीका बच्चू कडू यांनी केली. तसेच संविधान दिनाच्या (26 नोव्हेंबर) दिवशी लॉन्गमार्च काढण्याची घोषणा केली आहे.

भाजपने लोकशाहीचा केलेला खून आम्हाला अमान्य आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या! असे म्हणत अमरावतीतील चांदुरबाजार ते कलेक्टर ऑफिसपर्यंत लॉन्गमार्च काढण्याची घोषणा केली. यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;