झारखंडमध्ये बसला अपघात, 7 जणांचा मृत्यू; 12 हून अधिक प्रवाशी जखमी

झारखंडमध्ये बसला अपघात, 7 जणांचा मृत्यू; 12 हून अधिक प्रवाशी जखमी

कोलकाताहून बिहारला चाललेल्या बसला झारखंडमध्ये अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक प्रवाशी जखमी झाले. आणखी चार ते पाच जण बसखाली दबल्याचे कळते. जखमींना उपचारासाठी बरकट्ठा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

रस्त्यावरील दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने चालकाचे भरधाल बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे अपघाताची घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी एकच कल्लोळ माजला.

पोलीस आणि प्रशासकीय टीमकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. बसमधील प्रवाशांची अद्याप ओळख पटली नाही. बरकट्ठा येथे सहापदरी रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर अपघाताच्या घटना वाढत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;