रत्नागिरी जिल्ह्यात मतदान शांततेत, पाच विधानसभा मतदारसंघात 65 टक्के मतदान

रत्नागिरी जिल्ह्यात मतदान शांततेत, पाच विधानसभा मतदारसंघात 65 टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी आज रत्नागिरीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून 1747 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हय़ामध्ये सुमारे 65 टक्के मतदान झाले.

जिल्हय़ातील पाच विधानसभा मतदारसंघात 38 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्हय़ामध्ये 1747 मतदान पेंद्रांमध्ये 13 लाख 23 हजार 413 मतदारांपैकी 65 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी 7 ते 9 या पहिल्या टप्प्यात मतदारांचा प्रतिसाद संथ होता. जिल्हय़ामध्ये 7 ते 9 दरम्यान 8.96 टक्के मतदान झाले. त्यामध्ये दापोलीत 8.54 टक्के, गुहागरमध्ये 9.16 टक्के, चिपळूणमध्ये 10.14 टक्के, रत्नागिरीत 9.07 टक्के आणि राजापुरात 8.89 टक्के मतदान झाले होते. 7 ते 11 वाजण्याच्या दरम्यान जिल्हय़ातील मतदानाची टक्केवारी 20.52 टक्क्यांवर पोहोचली. त्यावेळी दापोलीत 18.32 टक्के, गुहागरमध्ये 17.05 टक्के, चिपळूणमध्ये 24.57 टक्के, रत्नागिरीत 18.60 टक्के आणि राजापुरात 24.07 टक्के मतदान झाले होते. दुपारी 11 ते 1 या वेळेत मतदानाने वेग घेतला. जिल्हय़ामध्ये मतदानाचे प्रमाण 38.52 टक्क्यांवर पोहोचले. त्यामध्ये दापोलीत 37.01 टक्के, गुहागरमध्ये 40.45 टक्के, चिपळूणमध्ये 40.77 टक्के, रत्नागिरीत 32.02 टक्के आणि राजापूरात 40.98 टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हय़ातील मतदानाची टक्केवारी 60.35 टक्क्यांच्या घरात पोहोचली. त्यामध्ये दापोलीत 59.02 टक्के, गुहागरमध्ये 59.05 टक्के, चिपळूणमध्ये 63.51 टक्के, रत्नागिरीत 59 टक्के आणि राजापुरात 61.05 टक्के मतदान झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;