ए. आर. रेहमान – सायरा बानू यांचा घटस्फोट, ’30 वर्ष एकत्र राहू अशी अपेक्षा होती पण…’

ए. आर. रेहमान – सायरा बानू यांचा घटस्फोट, ’30 वर्ष एकत्र राहू अशी अपेक्षा होती पण…’

AR Rahman And Saira Banu Divorce: भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबर 2024 रोजी वकिलांनी एक निवेदन जारी करत दोघांच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे. वकील वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ शिवाय खुद्द ए आर रेहमान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली आहे.

वंदना शाह यांनी जारी केलेल्या निवदनानुसार, ‘लग्नाच्या अनेक वर्षांनंतर सायरा आणि बानू यांनी विभक्त होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं वकील म्हणाल्या आहे.

घटस्फोटानंतर ए आर रेहमान यांची पोस्ट

एक्सवर (ट्विटर) ए आर रेहमान यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लग्नानंतर 30 वर्ष पूर्ण करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा अंत असतो असं वाटत आहे. तुटलेल्या अंतःकरणाच्या भाराखाली देवाचे सिंहासन देखील हलू शकतं. असं असताना देखील आपण अर्थ शोधत असतो… आमच्या मित्रांनो, आम्ही या नाजूक काळातून जात असताना आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.’, ए. आर. रेहमान यांची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ए आर रेहमान आणि पत्नी सायरा बानू यांचं लग्न आणि मुलं

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न 1995 मध्ये केलं होतं. लग्नानंतर सायरा यांनी तीन मुलांना जन्म दिला. दोन मुली आणि एक मुलगा अशी त्यांची मुलं आहे. त्यांच्या मुलींची नावे खतीजा, रहीमा अशी असून मुलाचं नाव अमीन असं आहे.

सांगायचं झालं तर, सायरा बानो यांनी याआधी एका निवेदनाद्वारे विभक्त होण्याची घोषणा केली होती. दोघेही बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होते. घाईघाईत कोणताही निर्णय झालेला नाही. सायरा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, त्या आता हे नातं वाचवू शकत नाही. आणि अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;