पैशाशिवाय भाजपकडे आता काही उरलेलं नाही; विनोद तावडे-‘बविआ’तील राड्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

पैशाशिवाय भाजपकडे आता काही उरलेलं नाही; विनोद तावडे-‘बविआ’तील राड्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप चांगलीच हादरली होती. त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजना आणून महिलांना 1500 रुपये दिले. परंतु, ही निवडणुकही त्यांच्या हातात येत नाही. जे लोकसभेला मुद्दे होते ते आताही आहेत. त्यामुळे भाजपचा एकमेव कार्यक्रम आहे पैसे वाटपाचा, असा सणसणीत टोला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

विरार पूर्वेच्या विवांत हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना घेरले. विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप ‘बविआ’ने केला. मोठा राडा झाला. यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या सर्व घटनेवर पृथ्वीराज चव्हाण यांनी TV9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या मतदारसंघातही भाजपचा उमेदवार पैसे वाटताना सापडला. विनोद तावडेंसारखे दिल्लीतील भाजपचे ज्येष्ठ आणि राष्ट्रीय नेते अशा प्रकारे येऊन तिथे बसले असतील. तर या निवडणुकीत फक्त पैशांशिवाय भाजपकडे आता काही उरलेलं नाही. त्यांना एकही मुद्दा, जनतेचा प्रश्न सोडवता आलेला नाही. प्रचंड मोठा भ्रष्टाचार करून हे सरकार चाललेलं आहे. प्रशासनाची पातळी इतकी खाली कधीही गेली नव्हती. याला राज्यातले नेते जितके जबाबदार आहेत तितकेच देशातले नेतेही जबाबदार आहेत, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

मुळातच एकनाथ शिंदे सरकार स्थापन झालं तेच पापात निर्माण झालं. 50-50 कोटींचा विषय झाला. आणि आता प्रत्येक ठिकाणी लोकं पैसे वाटताना सापडत आहेत. पैसे वाटल्याशिवाय आता त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग राहिलेला नाही. महाराष्ट्राची जनता त्यांना चोख उत्तर देईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;