भाजपनं पराभव स्वीकारला; प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधीच मोदींनी रणभूमीतून पळ काढला! रेवंत रेड्डी यांचा हल्लाबोल

भाजपनं पराभव स्वीकारला; प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधीच मोदींनी रणभूमीतून पळ काढला! रेवंत रेड्डी यांचा हल्लाबोल

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या बुधवारी मतदान होणार आहे. त्यासाठी गेले 12-13 दिवस राज्यभरात प्रचारसभांच्या धडाक्याने वातावरण चांगलेच तापले. आज शेवटच्या दिवशीही प्रचाराच्या तोफा धडधडणार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात पळ काढला, असा हल्लाबोल तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार आहेत. प्रचारतोफा थंडावण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी देश सोडून विदेशात पळाले आहेत. याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष आणि मोदींनी पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रणभूमीतून पळ काढला, असा टोला रेवंत रेड्डी यांनी लगावला.

भाजपने आज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींचाही रेड्डी यांनी उल्लेख केला. ते म्हणाले. भाजपने आज वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिराती मी पाहिल्या. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप देशात फूट पाडत आहे. कोणतीही समस्या, आपत्ती आली तेव्हा संपूर्ण देशाने त्याचा एकजुटीने सामना केला. मग बॉम्बस्फोट असो किंवा हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्चन दंगली असो… कोणतीही आपत्ती आली तर देश एकजुटीने उभा राहोत आणि त्याचा सामना करताना दिसतो.

पण मोदी तीन वेळा पंतप्रधान झाले. 11 वर्षापासून ते पंतप्रधान आहेत. पण भाजप आणि मोदींनी काय केले, गरीबांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने काय केले याबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नसल्याने ते बॉम्बस्फोट आणि इतर मुद्दे प्रचारात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;