मोदी, फडणवीस यांनी पाडला खोट्या घोषणांचा पाऊस : दानवे

मोदी, फडणवीस यांनी पाडला खोट्या घोषणांचा पाऊस : दानवे

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. या सभेत त्यांनी केवळ शहर विकासाच्या थापा मारून खोट्या घोषणांचा पाऊस पाडला, असा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मागील वर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून अमृतमहोत्सवी वर्षाच्या समारोपप्रसंगी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठवाडा विकासासाठी 46 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली.

मराठवाडा वॉटरग्रीड आणणार, असे घोषित करण्यात आले. मात्र दीड वर्षात एका रुपयाचा निधीही उपलब्ध करून दिला नाही. मनपाच्या माध्यमातून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना महाविकास आघाडीच्या काळात मंजूर करण्यात आली. 1680 कोटी रुपयांच्या या योजनेचा शुभारंभ उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना करण्यात आला. योजनेसाठी मनपाचा हिस्सा मनपा भरू शकत नसल्याने आपण राज्य शासनामार्फत देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र नंतरच्या अडीच वर्षात या योजनेचे काम रेंगाळले आहे. याला राज्य सरकार पूर्णतः जबाबदार आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

7 हजार 274 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मिंधे आणि भाजप सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मराठवाड्यातील 7 हजार 274 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. ना पीकविमा, ना नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले. नाही. त्यामुळेच त्यांनी टोकाची भूमिका घेतली. भाजप-मिंधे गटाचे 1812 पदाधिकारी शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातील भाजप आणि मिंधे गटाला कंटाळून 1812 पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, असे दानवे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;